June 24, 2025 3:22 PM

views 27

धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. यामधे गावांमधल्या स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचरा व्यवस्थापन, घनककचरा आणि सांडपाणी  व्यवस्थापन, खतखड्डे, प्लास्टिक संकलन आणि त्याच्या व्यवस्थापनाचा समावेश आहे.