November 28, 2024 1:14 PM November 28, 2024 1:14 PM

views 9

बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं मंत्री अन्नपूर्णा देवी यांचं प्रतिपादन

केंद्र सरकारच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ या राष्ट्रीय अभियानाचा प्रारंभ काल नवी दिल्ली इथं झाला. बालविवाहाच्या रूढीचं निर्मूलन करणं, हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे. अभियानासाठी  १३० जिल्ह्यांची निवड झाली असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या मोहिमेचं उद्घाटन करताना सांगितलं.   बालविवाह हा केवळ गुन्हाच नव्हे तर मानवी हक्कांचं उल्लंघन आहे असं सांगून मंत्री म्हणाल्या की, बाल विवाह मुक्त भारत मोहीम हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम नसून एक निरंतर चळवळ आहे. अन्नपूर्णा देवी...

November 27, 2024 7:45 PM November 27, 2024 7:45 PM

views 29

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर केले. गावकऱ्यांनी बालविवाह होणार नाही अशी सामुहिक प्रतिज्ञा ग्रामसभांमध्ये घेतली. या ग्रामसभांमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, आशा स्वयंसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील, गावातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.   गडचिरोली जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग तसंच ‘स्पर्श’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत गडचिरोली श...

October 18, 2024 3:32 PM October 18, 2024 3:32 PM

views 1

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत-सर्वोच्च न्यायालय

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठाने आज बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वंही जारी केली. बालविवाह रोखण्याच्या उद्देशाने या कायद्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या अधिकारांचं संरक्षण यालाच प्राधान्य असून वैयक्तिक कायदे या अंमलबजावणीत अडथळे म...