October 28, 2025 6:58 PM October 28, 2025 6:58 PM

views 23

Cabinet Decisions: रबी हंगामासाठी खतांवर ३७,९५२ कोटी अनुदान

रबी हंगामासाठी खतांवर ३७ हजार ९५२ कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील, असं वैष्णव म्हणाले. खतांचे आंतरराष्ट्रीय दर लक्षात घेऊन खतांच्या अनुदानाचे नवे दर निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. हे दर एक ऑक्टोबरपासून लागू होतील.    आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना आज केंद्रीय मंत्रिम...

October 1, 2025 3:16 PM October 1, 2025 3:16 PM

views 103

सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्के वाढवला आहे. यामुळं महागाई भत्ता ५८ टक्के होईल. १ जुलैपासून हे दर लागू होतील अशी माहिती केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशात ५७ नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे.

September 24, 2025 8:29 PM September 24, 2025 8:29 PM

views 12

सुमारे ९५ हजार कोटी रुपयांच्या ६ प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशाच्या जहाजबांधणी आणि आणि समुद्रमार्गे व्यापार क्षेत्रातल्या सुमारे ९५ हजार कोटी रुपयांच्या ६ प्रस्तावांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या क्षेत्राच्या पुनर्सक्षमीकरणासाठी आणि अनुकूल परिसंस्था उभारण्यासाठी ६९ हजार ७२५ कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या आहेत. देशांतर्गत क्षमता वृद्धी, दीर्घ मुदतीचा वित्तपुरवठा सुधारणं, तसंच जहाजबांधणीसाठी नवीन गोदी निर्मिती आणि जुन्या गोद्यांचं पुनरु...

August 12, 2025 8:08 PM August 12, 2025 8:08 PM

views 14

राज्यात १५ हजार पोलीस भरती करायला मंजुरी

राज्याच्या पोलीस दलात सुमारे १५ हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा  निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. आता या दुकानदारांना प्रतिक्विंटल दीडशे ऐवजी १७० रुपये फायदा मिळेल. सोलापूर - पुणे मुंबई हवाई  मार्गासाठी व्यापारी तूट भरुन काढण्यासाठी निधी देण्याचा निर्णयही आज झाला. याशिवाय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळांतर्फे राबवण्यात येणाऱ्य...

June 17, 2025 8:07 PM June 17, 2025 8:07 PM

views 1

Cabinet Decision : महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ला मंजुरी

महाॲग्री-एआय (MahaAgri-AI), अर्थात महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. यामुळे कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येईल. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातले ॲग्रीस्टेक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढं न्याय...

May 28, 2025 7:48 PM May 28, 2025 7:48 PM

views 9

पणन हंगामासाठी १४ खरीप पिकांकरता किमान आधारभूत दरात वाढ

सन २०२५ २०२६ च्या पणन हंगामासाठी १४ खरीप पिकांकरता किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. यात सर्वाधिक निव्वळ वाढ कारळासाठी ८२० रुपये प्रतिक्विंटल, त्याखालोखाल रागीसाठी ५९६ रुपये, कापसासाठी ५८९ रुपये, तर तिळासाठी ५१९ रुपये प्रतिक्विंटल असल्याचं त्यांनी सांगितलं.    त्याशिवाय मका १७५ रुपये प्रतिक्विंटल, बाजरी १५० रुपये, ज्वारी ३२८, भात ६९,  त...

May 27, 2025 8:35 PM May 27, 2025 8:35 PM

views 20

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी लागणारं नोंदणी शुल्क माफ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी लागणारं नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबई इथं झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेट्टी आयोगाच्या शिफारसींनुसार राज्यातल्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदं निर्माण करण्यासाठीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडमधल्या १ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथ...

April 30, 2025 7:33 PM April 30, 2025 7:33 PM

views 7

केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार

आगामी जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या राजकीय विषयसंबंधी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. जातीनिहाय लोकसंख्या पारदर्शीपणे समजावी आणि समाजात ऐक्य स्थापन व्हावं हा याचा हेतू असल्याचं वैष्णव म्हणाले.    ऊसासाठी २०२५ च्या खरेदी हंगामाकरता ३ हजार ५५० रुपये प्रतिटन एफआरपी अर्थात रास्त भाव द...

April 9, 2025 7:56 PM April 9, 2025 7:56 PM

views 1

जलव्यवस्थापन आधुनिकीकरणाची कामं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत करण्याला मंजूरी

कमांड क्षेत्र विकास आणि जलव्यवस्थापन आधुनिकीकरणाची कामं प्रधानमंत्री  कृषी सिंचन योजनेअंतर्गत करण्याला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. याकरता सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना जास्त पीक मिळवण्यासाठी मदत होईल. या अंतर्गत सुरू होणाऱ्या ७८ प्रकल्पांमध्ये ८० हजार शेतकऱ्यांचा समावेश केला जाईल, असंही वैष्णव म्हणाले.    आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमधल्या तिरुपती-पकला-कटपाडी रेल्वे मार्गाच...

February 11, 2025 7:49 PM February 11, 2025 7:49 PM

views 3

पालघर जिल्ह्यातल्या देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता

पालघर जिल्ह्यातल्या देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळं चाळीस लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. यातून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी ६९ दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त आरक्षित असणार आहे.    पुणे जिल्ह्यातल्या दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातल्या सिंचनासाठीच्या जनाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतर करण्याच्या कामाला आणि त्यासाठीच्या ४३८...