July 9, 2025 9:10 PM

views 24

गुजरातमधे अपघातातल्या मृतांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पदर इथं आज पहाटे पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आणंद आणि बडोदा जिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता.   अपघात झाल्यानंतर बडोदा जिल्हा प्रशासनानं तातडीनं बचावकार्य हाती घेतलं असून, स्थानिक नागरिकही त्यांना मदत करत आहेत. आणंद इथून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाहनांची वाहतूक सुरू असताना हा पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात ...

June 16, 2025 1:15 PM

views 22

पुण्यातल्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं ४ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. दोन ते तीन जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.    दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.    या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारन...