January 4, 2025 1:36 PM January 4, 2025 1:36 PM

views 14

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर ४ धावांची माफक आघाडी, मात्र दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी पुन्हा गडगडली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या, सिडनी इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात, भारतानं दुसऱ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात ६ बाद १४१ धावा केल्या आहेत. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ १८१ धावांत गुंडाळला आणि पहिल्या डावात ४ धावांची माफक आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ तर जसप्रीत बुमराह आणि नितेश रेड्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.   त्य...

December 25, 2024 6:44 PM December 25, 2024 6:44 PM

views 9

बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतला चौथा सामना उद्यापासून रंगणार

बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतली चौथी कसोटी उद्यापासून मेलबर्न इथं रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.  

December 18, 2024 1:50 PM December 18, 2024 1:50 PM

views 19

बॉर्डर-गावस्कर चषक : भारत – ऑस्ट्रेलियात यांच्यातला तिसरा सामना अनिर्णित

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला.   आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत ८ धावांची भर घालून २६० धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात वेगानं धावा करत ७ बाद ८९ धावा झाल्या असताना डाव घोषित केला, आणि पहिल्या डावातल्या १८५ धावांच्या आघाडीसह भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचं आव्हान ठेवलं.   मात्र भारताच्या दुसऱ्या डावात केवळ २ षटकं आणि १ चेंडूचा ...

December 7, 2024 7:27 PM December 7, 2024 7:27 PM

views 10

बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची भारतावर १५७ धावांची आघाडी

बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३७ धावांवर आटोपला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली आहे. आज दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात ५ बाद १२८धावा झाल्या होत्या.     पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत १-०नं पुढे आहे. पर्थ इथं झालेल्या पहिल्या कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा विजय मिळवला होता.