January 5, 2025 7:37 PM

views 14

बीडमधे स्वच्छ माझे अंगण उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान

बीड जिल्ह्यात, स्वच्छ माझे अंगण उपक्रमांतर्गत ४ लाख ७२ हजारहून अधिक कुटुंबांमध्ये स्पर्धा होणार असून येत्या प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान केला जाणार आहे.    बीड जिल्ह्यात १३५ गावामध्ये घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यानुसार काम सुरू आहे. यासंबंधी ग्रामस्थांमध्ये अधिक जनजागृती होण्यासाठी १ जानेवारी २६ जानेवारी या कालावधीत स्वच्छ माझे अंगण उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा, खत खड्डा, तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन कचराकुं...

January 5, 2025 8:12 PM

views 27

मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, आंदोलनाच्या निमित्ताने खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया हे सगळे जण जाहीर सभांमध्ये समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करत आहेत. आपल्या विधानांतून ते मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट निर्माण करत आहेत. त्यामुळे या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बीडमधल्या काही नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आज काही नागरिकांनी एकत्र येत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मागणीचं ...

December 28, 2024 7:35 PM

views 18

बीडमध्ये सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मूकमोर्चा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.  शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून  मोर्चाला सुरुवात झाली.    शहरातील प्रमुख मार्गांवरून हा महामूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यावर, त्याचं सभेत रूपांतर झालं. खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, छ...

December 14, 2024 10:19 AM

views 87

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ‘‘संतोष देशमुख यांचं गेल्या सोमवारी नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या गुन्ह्यातील आरोपी जयराम माणिक चाटे तसंच महेश सखाराम केदार या दोघांना, १० डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीमधून तर अन्य एक आरोपी प्रतिक भिमराव घुले यास ११ डिसेंबर रोजी पुण्यातून अटक करण्यात आली.  ...