August 6, 2024 1:40 PM August 6, 2024 1:40 PM

views 11

बांग्लादेशातल्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, युनायटेड किंगडमची मागणी

बांग्लादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, अशी मागणी युनायटेड किंगडमच्या सरकारनं केली आहे. बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निवासस्थानामध्ये घुसून काल आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लष्करी विमानातून देश सोडला. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये शांतता आणि लोकशाही कायम राहायला हवी, असं युकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी काल सांगितलं. बांगलादेशात गेल्या दोन आठवड्यांमध्ये अभूतपूर...

August 5, 2024 7:13 PM August 5, 2024 7:13 PM

views 13

बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांचा राजीनामा

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगला देशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ढाक्यातलं प्रधानमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान गोनोभवनवर आज शेकडो आंदोलकांनी हल्ला केला. त्यानंतर शेख हसीना देश सोडून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी निघून गेल्याचं वृत्त आहे. देश चालवण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल, असं बांगलादेशाचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी म्हटलं आहे. दूरचित्रवाणी वरून संबोधित करताना त्यांनी देशवासियांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन क...

August 5, 2024 1:30 PM August 5, 2024 1:30 PM

views 20

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं – परराष्ट्र मंत्रालय

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. बांग्लादेशातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं ही सूचना केली आहे. सध्या बांग्लादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं तसंच ढाक्यातल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

August 5, 2024 12:14 PM August 5, 2024 12:14 PM

views 20

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक

बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी निदर्शक, आंदोलक, पोलिस आणि सत्ताधारी पक्ष समर्थक संघटनांच्या कार्यकर्त्यांदरम्यान काल झालेल्या संघर्षाला हिंसक वळण लागलं. त्यात 13 पोलिस कर्मचाऱ्यांसह 90 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी काल राष्ट्रव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं असून, शेख हसीना सरकारच्या राजीनाम्याची मागणीचा आग्रह धरला आहे. सरकारनं काल ढाका आणि देशातल्या अन्य भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. सरकारनं आंदोलकां...

August 3, 2024 12:40 PM August 3, 2024 12:40 PM

views 13

बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलकांच्या झालेल्या हत्यांच्या विरोधात उद्यापासून देशभरात असहकार आंदोलन

बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलकांच्या झालेल्या हत्यांच्या विरोधात आणि त्यांनी मांडलेल्या नऊ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी उद्यापासून देशभरात असहकार आंदोलन पुकारलं आहे. यात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं आहे. तसंच आजही देशात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. भेदभावविरोधी विद्यार्थी चळवळीच्या दोन समन्वयकांनी विविध समाजमाध्यमांवरून काल ही घोषणा केली. जवळपास दोन आठवड्यांनंतर काल राजधानी ढाकासह विविध ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्यात झालेल्या संघर्षात दोन जणांचा मृत्य...

July 25, 2024 8:41 PM July 25, 2024 8:41 PM

views 17

बांगलादेशातून आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

बांगलादेशातून आतापर्यंत ६ हजार ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी भारतात परतले असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. ढाकामधल्या भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित प्रवासाची व्यवस्था भारत बांग्लादेश सीमेपर्यंत तसंच विमानतळापर्यंत केली आहे, विद्यार्थ्यासाठी चोवीस तास संपर्क यंत्रणा कार्यरत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

July 20, 2024 8:52 PM July 20, 2024 8:52 PM

views 8

बांगलादेशातून १ हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत

बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसक संघर्षाच्या काळात बांगलादेशातून सुमारे एक हजार भारतीय विद्यार्थी सुखरूप परत आले आहेत. यापैकी ७७८ विद्यार्थी जलमार्गाने, तर सुमारे दोनशे विद्यार्थी हवाई मार्गाने भारतात परत आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, तसंच चित्तगाँग, राजशाही, सिल्हेत आणि खुलना इथली सहायक उच्चायुक्तालयं स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढायला मदत करत आहेत, आणि बांगलादेशातल्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत अ...

July 20, 2024 3:15 PM July 20, 2024 3:15 PM

views 10

बांगलादेशात हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच लष्कर तैनात करण्यात आलं आहे. बांगलादेशातल्या सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाच्या धोरणात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन पुकारलं होतं. त्याला हिंसक वळण लागून विद्यार्थी आणि पोलिसांच्यात झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत १०५ जण ठार झाले आहेत.  

July 18, 2024 8:35 PM July 18, 2024 8:35 PM

views 12

बांगलादेशात कोटा सुधारणा आंदोलनाला हिंसक वळण

बांगला देशात कोटा सुधारणा आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आणि यात चार जणांचा मृत्यू तर शेकडो लोक जखमी झाले. या आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आज देशव्यापी बंद ची घोषणा केली होती आणि ढाक्यातले मुख्य महामार्ग, रेल्वे मार्ग, मेट्रो मार्गांची वाहतूक रोखली होती. बांगलादेशचे कायदा सुव्यवस्था आणि संसदीय कार्यमंत्री अनीसूल हक यांनी या आंदोलकांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. बांगलादेश सरकारनं पोलिसांच्या तुकड्यांसोबत सीमा सुरक्षा दलाच्या २२९ तुकड्या तैनात केल्या आहेत.   बांग्लादेशामधल्या भारतीय ...

July 18, 2024 1:32 PM July 18, 2024 1:32 PM

views 10

बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

बांगलादेशात, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठीच्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा व्हावी या मागणीसाठी विद्यापीठांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गेल्या दोन दिवसांत हिंसक वळण लागलं असून त्यामध्ये ६ जणांना जीव गमवावा लागला आहे तर, शेकडो जखमी झाले आहेत. यामुळे सरकारनं सर्व शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ढाका आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस, बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि इतर निमलष्करी दलांची पथकं नियुक्त केली आह...