December 25, 2025 2:49 PM

views 33

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी नवी दिल्लीतल्या सदैव अटल या समाधीस्थळी जाऊन वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. अटल बिहारी वाजपेयींनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रनिर्माण आणि सुशासनासाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्री मोदी आपल्या समाजमाध्यमावरल्या  संदेशात म्हणाले. वाजपेयी यांचं व्यक्तिमत्व, कार्य आणि नेतृत्व देशाच्या विकासाच्या कार्यात स...

December 25, 2025 10:18 AM

views 68

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन

माजी प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लखनौला भेट देणार आहेत. दुपारी 2:30 वाजता, मोदी यांच्या हस्ते राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन होणार असून, त्यानंतर ते तिथल्या जनसभेला संबोधित करतील. स्वतंत्र भारतातील महान व्यक्तिमत्त्वांच्या वारशाला सन्मान देण्याचा पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प आहे. देशाच्या लोकशाही, राजकीय क्षेत्र आणि देशाच्या विकासात खोल प्रभाव पाडणाऱ्या महान नेत्यांच्या जीवन आणि आदर्शांप्रती ही श्रद्धांजली आहे. राष्ट्र प्...

December 25, 2024 8:13 PM

views 25

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आजची शतकमहोत्सवी जयंती आपणा सर्वांसाठी सुशासनाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या खजुराहो इथं देशातल्या पहिल्या, महत्त्वाकांक्षी आणि बहुद्देशीय केन-बेटवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या पहिल्या, ओंकारेश्वर तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण, तसंच १ हजार १५३ अटल ग्राम सुशासन भवनांचं भूमिपूजनही मोदी यांनी य...

December 25, 2024 3:32 PM

views 22

देशभरातल्या अटल सुशासनभवनांच्या पायाभरणीसह विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. परंतु भाजपा सरकारसाठी सुशासन ही संकल्पना एका दिवसापुरती मर्यादित नसून तीच सरकारची खरी ओळख असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मध्य प्रदेशात खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली.त्यावेळी ते बोलत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या समृतीप्रीत्यर्थ एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय नद...