June 8, 2025 7:42 PM June 8, 2025 7:42 PM
13
आसाममध्ये पुरस्थितीत सुधारणा
आसाममधल्या पुरस्थितीत आज आणखी सुधारणा झाली आहे. मात्र ३० हजाराहून अधिक स्थानिक अजूनही छावण्यांच्या आश्रयाला असून १२ जिल्ह्यांमधल्या ९०० गावांमधले ३ लाखाहून अधिक नागरिक महापुरात अडकलेले आहेत. ब्रह्मपुत्रेचा पूर ओसरला असला तरी अन्य नद्या मात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. महापुरात अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सुरु आहे. आसामच्या केचर, श्रीभूमी तसंच हेलकंदी जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.