October 2, 2025 11:21 AM October 2, 2025 11:21 AM

views 47

केंद्रीय मंत्रिमंडळाने, डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने, डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला काल मंजुरी दिली. देशांतर्गत डाळीच्या उत्पादनात वाढ करणे आणि स्वयंपूर्ण होणं असा या अभियानाचा उद्देश आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. 2025 ते 2031 या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये हे अभियान राबवले जाणार असून, त्यासाठी 11 हजार 440 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय, 2026-27 सालच्या विपणन हंगामासाठी सर्व अनिवार्य रबी पिकांच्या किमान ...

December 11, 2024 7:11 PM December 11, 2024 7:11 PM

views 8

केंद्र सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कायदा करण्याच्या विचाराधीन

केंद्र सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याच्या विचाराधीन असून, यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशात एक व्यापक भारत एआय मिशन सुरू करण्यात आलं असून, त्यात एआय कंप्युट सुविधा निर्माण करणं, कौशल्य फ्रेमवर्क, स्टार्ट-अप्ससाठी वित्तपुरवठा, इनोव्हेशन सेंटर, डेटासेट प्लॅटफॉर्म तयार करणं आणि नवीन ॲप्लिकेशन तयार करणं यावर भर असेल  यासंदर्भात अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना ...

November 27, 2024 6:10 PM November 27, 2024 6:10 PM

views 29

समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं – मंत्री अश्विनी वैष्णव

समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. लोकसभेत आज पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, समाज माध्यम हे आजघडीला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचं मोठं माध्यम असलं तरी त्यावरच्या आशयाचं संपादन होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे अश्लील मजकूर देखील प्रकाशित केले जातात. ओटीटी माध्यमावरच्या आशयाविषयीही बोलताना वैष्णव म्हणाले की, आपल्या देशाची संस्कृती आणि समाजमाध्यमांचा उगम ...

June 16, 2024 2:46 PM June 16, 2024 2:46 PM

views 16

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी घेण्यात येणार

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली. सध्या वंदेभारत मध्ये केवळ बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. वंदेभारतमध्ये शयनयानाची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं वैष्णव म्हणाले. गेल्या दहा वर्षात ३५ हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचं जाळं निर्माण करण्यात आलं असून कमी उत्पन्न गटाच्या प्रवाशांनाही आरामदायी प्रवास-सोयी उपलब्ध करुन देण्याकडे आपण लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. अमृत भारत रेल्वेच्या उत्पाद...