July 25, 2024 3:14 PM
23
मराठा आरक्षण दिल्याचा विसर पडल्याची शेलारांची जरागेंवर टीका
मराठा समाजाचं आरक्षण ज्यांच्यामुळे रद्द झालं, त्यांच्या विरोधात मनोज जरांगे बोलत नसून ज्यांनी दिलं त्यांच्या विरोधात बोलतात, अशी टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षानं आरक्षण दिलं, याचा जरांगे यांना विसर पडल्याची टीकाही शेलार यांनी केली.