June 22, 2025 7:07 PM June 22, 2025 7:07 PM

views 26

Palkhi Updates : संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालख्या पुण्याहून रवाना

आषाढ वारीसाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज  पुण्यातून हडपसरमार्गे पुढे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. तर,संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर इथं असेल.   संत मुक्ताबाई पालखीचं आज बीड शहरात स्वागत झालं. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज संध्याकाळी अहिल्यानगरमधे पोहोचली. पोलिस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने दिंडीचं स्वागत करण्यात आलं. आज शहरात मुक्काम करुन उद्या ही दिंडी पंढरपूरकड...

June 20, 2025 10:24 AM June 20, 2025 10:24 AM

views 8

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन

टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आषाढी वारीसाठी काल आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. रात्री आठनंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री उशिरा मंदिर आणि शहर प्रदक्षिणा झाल्यावर पालखी सोहळा आजोळघरी विसावला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाला. त्यानंतर आकुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हा पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला. ...

June 21, 2025 10:17 AM June 21, 2025 10:17 AM

views 7

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात उत्साहात स्वागत

पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यनगरीत आगमन झालं. स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून, रांगोळ्या काढून दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत केलं. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवार्थ अन्नदान आणि इतर उपक्रम राबवून आपली सेवा अर्पण केली.   आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात असेल. उद्या सकाळी दोन्ही पालख्...

July 29, 2024 7:16 PM July 29, 2024 7:16 PM

views 14

आषाढी वारीत सहभागी १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी रुपये प्रदान

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातल्या १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी रुपये प्रदान करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. या दिंड्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २० हजार रुपये वर्ग करण्यात आल्यामुळं वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं भोसले महाराज यावेळी म्हणाले. आजच्या परत वारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित दिंडी प्रमुखांच्या वतीनं भोसले यांनी शासनाचे आभार मानले. वारकऱ्या...