December 11, 2025 8:11 PM December 11, 2025 8:11 PM

views 5

अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते अपघातात १४ मजूर ठार, ७ बेपत्ता

अरुणाचल प्रदेशातल्या अंजाव जिल्ह्यात एक डंपर हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १४ जण ठार आणि ७ जण बेपत्ता झाले आहेत, तर १ जण बचावला आहे. हे सर्व बांधकाम मजूर आसाममधल्या तिनसुकिया जिल्ह्यातले असून ते गेल्या सोमवारी कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. ही घटना अत्यंत दुर्गम भागात घडली.    त्यामुळे या दुर्घटनेबाबत उशिरा माहिती मिळाल्याचं तिनसुकियाच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आतपर्यंत १४ मृतदेह सापडले असून इतर ७ जणांचा शोध सुरु आहे.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या द...

February 20, 2025 12:59 PM February 20, 2025 12:59 PM

views 21

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही राज्ये सांस्कृतिक वारश्यानं समृद्ध असून तिथले नागरिक या अद्वितीय नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारश्याचं अभिमानानं जतन करतील, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दोन्ही राज्यातले लोक प्रगतीचा आणि उत्कृष्टतेचा नवा अध्याय लिहितील, असंही राष्ट्रपती म्हणाल्या.      केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अरुणाचल आणि मिझोरम मधल्या नागरिकांना राज्य स्थापन...

November 30, 2024 2:41 PM November 30, 2024 2:41 PM

views 18

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज अरुणाचल प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. दोइमुख इथल्या राजीव गांधी विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षान्त समारंभाचे ते प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमानंतर ते इटानगर इथं अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.

August 14, 2024 1:02 PM August 14, 2024 1:02 PM

views 15

अरुणाचल प्रदेशात ६,००० फूट तिरंगा घेऊन निघालेल्या रॅलीचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत अरुणाचल प्रदेशात सहा हजार फूट तिरंगा ध्वज घेऊन निघालेल्या रॅलीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. अरुणाचल प्रदेश ही देशभक्तीची भूमी असून राज्याच्या सांस्कृतिक वारशात ते स्पष्टपणे प्रतिबिंबित होतं. असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानासाठी जनतेचा उत्साह पाहून आपल्याला आनंद होत असल्याचंही ते म्हणाले