May 22, 2025 8:56 PM
13
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशभरातल्या १०३ अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राजस्थानमध्ये बिकानेर इथं विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. पाकिस्तान भारताबरोबरचं थेट युद्ध कधीच जिंकू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला प्रोत्साहन देऊन छुपं युद्ध खेळत आहे. पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादा विरोधात एकवटल्याचं ते यावेळी म्हणाले. यापुढे पाकिस्तानबरोबरची चर्चा केवळ पाक-व्याप्त काश्मीरवर केंद्रित असेल, असं...