June 11, 2025 3:14 PM June 11, 2025 3:14 PM
15
अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे देशाची एकात्मतेवर भर – गृहमंत्री अमित शाह
गेल्या अकरा वर्षांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या क्रांतीमुळे भारताचं नवनिर्माण झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवनवीन अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे देशाची एकात्मता आणि मजबूती यात भर पडल्याचं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या सुविधांमुळे व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वेगवान झाले आहेत असं शाह यांनी नमूद केलं आहे.