August 8, 2024 7:22 PM August 8, 2024 7:22 PM

views 7

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नाशिकमध्ये दिंडोरी इथं आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सुरू आहे. ही योजना राजकीय हेतूने प्रेरित नसून महिलांच्या सबलीकरणासाठी आ...

August 4, 2024 3:07 PM August 4, 2024 3:07 PM

views 12

पालकमंत्री अजित पवार यांचेकडून पुणे जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि त्यामुळे या नद्यांवरच्या धरणांमधून वाढवलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमझल्या पूरपरिस्थितीचा आज आढावा घेतला. जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवायचे आणि नदीकाठच्या सखल भागांमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करायचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. खडकवासला धरणातला वि...

August 1, 2024 7:55 PM August 1, 2024 7:55 PM

views 12

महामार्ग दुरुस्त केला नाही तर ‘ निलंबन ‘ – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक येत्या १० दिवसांत सुरळित झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. ते आज मंत्रालयात या महामार्गाच्या सुधारणेबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.   मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. त्यावर सध्या काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर प...

July 31, 2024 6:48 PM July 31, 2024 6:48 PM

views 14

राज्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज, अहमदनगर जिल्यातलं लिंगदेव, नाशिक जिल्ह्यातलं कळवण-सुरगणा, जांबुटके आणि अमरावती जिल्ह्यातलं वरुड इथं एमआयडीसी उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसंच राज्यात यापुढे एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमीनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातल्या त्यांच्या समिती कक्षात आज एमआयडीसी आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.    राज्याच्या ...

July 30, 2024 3:19 PM July 30, 2024 3:19 PM

views 6

‘आदिवासी शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार विभागानं प्रस्ताव सादर करावा’

राज्यातल्या आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या विविध योजनांचे लाभ मिळत नाहीत. त्यांना या योजनांचे लाभ मिळावेत म्हणून आदिवासी विभाग तसंच सहकार विभागानं सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली. आदिवासी शेतकऱ्यांसाठीच्या संस्थांना त्यांच्या गुणवत्तेनुसार वाढीव अनुदान द्यावं तसंच शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाकडच्या थकीत कर्जाबाबत तोडगा काढावा, असे...

July 29, 2024 6:59 PM July 29, 2024 6:59 PM

views 10

आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशाच प्रकारची याचिका सादर केली आहे. दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालय एकाचवेळी निर्णय घेणार आहे. या नोटीशीला उत्तर आल्यानंतर याचिका सुनावणीसाठी घ्यायच्या किंवा नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे.

July 23, 2024 3:41 PM July 23, 2024 3:41 PM

views 10

देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा हा अर्थसंकल्प देशवासियांची मनं जिंकणारा आणि देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भारताच्या १०० शहरांमध्ये प्लग अँड प्ले औद्योगिक पार्कची निर्मिती करण्याच्या धोरणामुळे मोठे बदल घडतील तसंच यामुळे भारतातील उद्योग आणि उद्योजकतेला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

July 16, 2024 6:34 PM July 16, 2024 6:34 PM

views 11

नांदेड जिल्ह्यात जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामं जलद गतीनं करावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातल्या  सर्वच जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामं जलद गतीनं करावीत, तसंच या योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीनं सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मंत्रालयातल्या समिती कक्षात नियोजन विभाग, वित्त विभाग तसंच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.  कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या क्षारपड जमिनींच्या सुधारणेसंदर्भात...

July 14, 2024 6:22 PM July 14, 2024 6:22 PM

views 13

बारामती इथं जन सन्मान’ रॅलीचं आयोजन

जनतेचा विकास आणि गरिबांना सहाय्य हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्व जनतेला सांगणार आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. बारामती इथं आयोजित जन सन्मान' रॅलीत ते आज बोलत होते. महाराष्ट्रात आबालवृद्ध किंवा माता भगिनींवर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. चांद्यापासून बांद्यापर्यत राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत, तीन सिलेंडर मोफत दिले जाणार असून राज्यातल्या म...

July 5, 2024 3:16 PM July 5, 2024 3:16 PM

views 8

महाराष्ट्रालाही विशेष दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार – अर्थमंत्री अजित पवार

  बिहार आणि आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. भविष्यात उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरील चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारने घालून दिलेल्या ३ टक्क्याच्या मर्यादेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. २०२८ पर्यंत राज्याची ...