February 25, 2025 1:19 PM February 25, 2025 1:19 PM
24
विकसित भारताकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर केंद्रीत झालं असून विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ॲडवांटेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर आज गुवाहाटी इथं ते बोलत होते. कारखाना क्षेत्राची वाढ आणि रोजगारनिर्मिती याकरता आवश्यक पायाभूत सोयी सुविधा आणि उद्योगांना अनुकूल वातावरण देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. पूर्वेकडच्या देशांबर...