February 24, 2025 8:56 AM February 24, 2025 8:56 AM

views 3

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

राज्य सरकार सीमा भागातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज दिल्ली इथं आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील  पवार यांनी दिली   दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांना बोलता भेटता यावं यासाठी स्थान निर्माण केलं जाईल, त्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल, असं पवार यांनी सांगितलं. त...

February 22, 2025 7:49 PM February 22, 2025 7:49 PM

views 4

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद

नवी दिल्लीत सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी वाचक आणि साहित्य रसिकांनी मोठी गर्दी केली होती. तालकटोरा स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज नगरी इथं भरलेल्या या संमेलनात आज विविध विषयांवर परिसंवाद रंगले.     ‘मराठी पाऊल पडते पुढे’ , 'मनमोकळा संवाद - मराठीचा अमराठी संसार' या विषयांवरील परिसंवादांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडपात कृष्णात पाटोळे आणि संघानं ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम सादर केला. यशवंतराव च...

February 22, 2025 3:22 PM February 22, 2025 3:22 PM

views 2

मराठी भाषेच्या विकासासाठी 10वीपर्यंतचं शिक्षण मराठीतूनच होण्याची गरज

सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतलं तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असं प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी केलं.  नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रात त्या काल बोलत होत्या.     मराठी भाषेच्या विकासासाठी दहावीपर्यंतचं शिक्षण मराठीतूनच होण्याची गरज भवाळकर यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला पुढे  नेण्यासाठी मराठी लिहिणारी, बोलणारी, मराठीत व्यवहा...

February 19, 2025 8:44 PM February 19, 2025 8:44 PM

views 4

पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित

दिल्लीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पहिल्यांदाच पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित केलं आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे यांचं नाव दिलं आहे, तर रेल्वे बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची नावं दिली आहेत.    या संमेलनाचा प्रारंभ आज पुणे रेल्वे स्थानकावर झाला. मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ,  आदी मान्यवर उपस्थित होते . ‘गर्जा महाराष्ट्र माझा‌’ या महाराष...

February 18, 2025 9:15 AM February 18, 2025 9:15 AM

views 13

९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात

९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला २१ फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. यासाठी ताल कटोरा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी उभारण्यात आली असून इथल्या विविध सभामंडपांना महाराष्ट्राल्या महान व्यक्तीमत्वांची नावं देण्यात आली आहेत. २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन ,मुलाखत, परिसंवाद असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.   या संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या आम्ही असू अभिजात या संमेलन गीताचं प्रकाशन काल मुंबईत राज्यपाल सी. पी. राध...