September 17, 2024 4:34 PM September 17, 2024 4:34 PM

views 7

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आठव्या भारत जल सप्ताहची सुरुवात

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाली. आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली तसंच अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं, असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. भारतीय धर्मग्रंथात हजारो वर्षांपासून जलसंधारणाचं महत्व सांगितल्याचंही त्या म्हणाल्या.  चार दिवसांच्या या कार्यक्रमात ४० देशातले दोनशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.  या कार्यक्रमात शंभरहून अधिक दालनं आणि जल क्षेत्रातले स्टार्टअप्स...