December 20, 2024 8:07 PM

views 22

रायगड अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर

रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघाली होती. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. वाटेत ताम्हिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचं अर्थसहाय्य करणार अस...

November 25, 2024 2:26 PM

views 19

२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीने झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन

संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता . असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं महाराष्ट्रात नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. २००४ ते २०१४ या १० वर्षात रेल्वेमधे ४ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती झाली होती परंतु २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली ...