September 26, 2024 7:40 PM September 26, 2024 7:40 PM
8
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ३ परमरुद्र संगणकांचं लोकार्पण
संशोधनातून स्वावलंबन हाच आजचा आपला मंत्र बनला आहे. विज्ञानाचं महत्त्व केवळ शोध आणि विकासातच नाही तर प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. हवामान आणि वातावरण बदलासाठीची उच्च क्षमता कम्प्युटिंग यंत्रणा असलेल्या पुणे इथल्या तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटिंग प्रणाली तसंच, उच्च कार्यक्षमतेच्या संगणकीय प्रणालीचं उद्घाटन त्यांनी दूरदृश्य पद्धतीनं केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत संगणकीय क्षेत्र तसंच विज्ञान-तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्य...