December 3, 2024 7:02 PM

views 14

सुगम्य भारत अभियानाचा आज नववा वर्धापन दिन

दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक वातावरण असलेला भारत निर्माण करण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या सुगम्य भारत अभियानाचा आज नववा वर्धापन दिन आहे. पायाभूत सुविधा, वाहतुकीच्या सोयी आणि सार्वजनिक जागांचा वापर दिव्यांगांना अधिक चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं. तसंच दिव्यांगांचे हक्क आणि त्यांच्या गरजांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीही हे अभियान सुरू करण्यात आलं. गेल्या ९ वर्षांत या अभियानानं आपल्या उद्दिष्टाचे अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. सरकारी इमारती तसंच वाहतूक...