June 18, 2025 3:25 PM

views 22

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहू इथं सुरु झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं, त्यानंतर पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली. देहू इथे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचं आणि संतसृष्टीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. या सोहळ्यात सुमारे ५०० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांची पालखी उद्या आळंदीहून प्रस्थान ठेवेल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेली संत निवृत्त...

June 18, 2025 9:05 AM

views 29

राज्यात आतापर्यंत सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

राज्यातल्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११ पूर्णांक ७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ सरासरी आठ टक्के इतकं आहे. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

April 17, 2025 10:48 AM

views 12

विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार – मुख्यमंत्री

शेतीविषयक विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात वर्ष २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीनं झालेल्या भूसंपादनात जमिनीचा कमी मोबदला मिळालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली असून हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ...

February 7, 2025 9:32 AM

views 31

पुणे हे देशाचं संरक्षण उत्पादनाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

देशाचं डिफेन्स क्लस्टर अर्थात संरक्षण उत्पादनाचं केंद्र महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यापूर्वी संपूर्ण संरक्षण उत्पादनांचे आयात करणारा आपला देश आज 25 हजार कोटी रुपयांची निर्यात करत आहे. संरक्षण क्षेत्रात जगातील प्रगत देशांमध्ये आपला समावेश होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मेक ...

January 16, 2025 3:45 PM

views 24

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया-सिडबी कडून स्टार्ट अपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुप...

November 27, 2024 8:26 PM

views 15

राज्यात सत्तास्थापनेबाबत अद्याप निर्णयाची प्रतीक्षा, मुख्यमंत्री आज भूमिका स्पष्ट करणार

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही अडसर नाही, कसलीही नाराजी नाही असं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे कळवल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात आपली ओळख लाडका भाऊ अशी झाली याचं समाधान आह...

October 15, 2024 11:16 AM

views 23

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारपिंपळगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. मराठवाड्यामध्ये जे आवश्यक आहे, त्या बाबी करून नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून समुद्रात वाया जाणारं पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, हे देशातल...

August 27, 2024 3:43 PM

views 22

छत्रपती शिवाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार – दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी राज्य शासनानं भारतीय नौदलाशी समन्वय साधून १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यांनी राजकोट इथं पुतळा जिथे कोसळला त्या ठिकाणाची पाहणी केली आणि त्याच जागी १०० फुटी पुतळा उभारण्यासंबंधी मुंबईला परतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आराखडा तयार करण्या-चं आश्वासन दिलं. या ...

July 24, 2024 7:26 PM

views 22

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं – मुख्यमंत्री 

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई इथं दिले. ते सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या हळद संशोधन केंद्राबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते.   हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथे आगामी ३ वर्षात सुरु होणार असलेल्या देशातल्या पहिल्या हळद संशोधन केंद्रामुळे मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागात सुवर्णक्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या केंद्रासाठी ८०० क...