August 19, 2024 6:33 PM August 19, 2024 6:33 PM

views 13

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला आहे. मराठा आरक्षण तसंच सगेसोयऱ्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्री शिंदे यांना काम करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे मात्र त्यांना देवेंद्र फडनवीस काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर फडनवीस यांनी आज बातमीदारांशी बोलताना उत्तर दिलं. मराठा समाजासाठी आजपर्यंत जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्य...

July 24, 2024 7:03 PM July 24, 2024 7:03 PM

views 24

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जालनाच्या आंतरवाली सराटी इथं गेल्या पाच दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. सरकारचा जीव ज्या खुर्चीत अडकला आहे, ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीला आम्ही लागणार आहोत, असं जरांगे यांनी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

June 14, 2024 8:45 AM June 14, 2024 8:45 AM

views 22

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरेसंदर्भातली अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, या काळात मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आ...

June 13, 2024 7:28 PM June 13, 2024 7:28 PM

views 44

मनोज जरांगेंच उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी इथं सुरू असलेलं आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मंत्री शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.   सरकार सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून यावर एका महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असं शंभुराज देसाई यांनी उपस्थित आंदोलकांना सांगितलं. तर सरकार १३ जुलैपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण करेल, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.