September 26, 2024 3:18 PM

views 19

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान

मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे.   राज्यात गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी तर ३ जण बेपत्ता आहेत. मुंबईत अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश म...

June 27, 2024 6:21 PM

views 23

बाणगंगा तलाव परिसरात नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश

मुंबईत बाणगंगा तलाव परिसरात दुरुस्तीदरम्यान पायऱ्यांचं नुकसान झाल्यासंदर्भात  कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेनं दिले आहेत. ऐतिहासिक बाणगंगा तलाव आणि परिसरातल्या पुनरूज्जीवन कामांची पाहणी आयुक्त भूषण गगराणी यांनी आज केली. यावेळी पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित टप्प्यातली कामं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसंच तलावातला गाळ काढण्याची सूचनाही त्यांनी दिली.