December 5, 2024 1:35 PM

views 22

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ब्रिस्बेन इथं सुरु

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ब्रिस्बेन इथं सुरु आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारतीय फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. भारताच्या हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना फारशी चमक न दाखवता माघारी परतल्या. त्यामुळे भारतीय संघ ३४ षटकांत सर्वबाद १०० धावा करू शकला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सलामीची फलंदाज फिबी लिचफिल्ड ३५ धावा काढून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच...

October 15, 2024 2:30 PM

views 48

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सचिव स्तरावरची नवी दिल्लीत चर्चा 

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सचिव स्तरावरची चर्चा नवी दिल्लीत झाली. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यात सहभागी झाले होते. यावेळी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य राखणं तसंच भारत - ऑस्ट्रेलिया सर्वंकष भागिदारीवरही यावेळी चर्चा झाली.