April 17, 2025 3:33 PM April 17, 2025 3:33 PM

views 7

अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून आनंद व्यक्त

अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती - मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की, या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल.  

September 19, 2024 7:19 PM September 19, 2024 7:19 PM

views 10

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक प्रस्थापित करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२४ परिषदेला आज पहिल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. प्रगतीशील कृषी पद्धती, भक्कम प्रशासकीय यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे खाद्य प्रक्रिया क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यापक सुधारणा सुरू केल्या असल्याचं ते म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवण...

September 19, 2024 6:01 PM September 19, 2024 6:01 PM

views 11

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२४ परिषदेला आज पहिल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. प्रगतीशील कृषी पद्धती, भक्कम प्रशासकीय यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे खाद्य प्रक्रिया क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यापक सुधारणा सुरू केल्या असल्याचं ते म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवण...

August 19, 2024 8:13 PM August 19, 2024 8:13 PM

views 9

मलेशियाचे प्रधानमंत्री दातोसेरी अन्वर भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मलेशियाचे प्रधानमंत्री दातोसेरी अन्वर भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार असून आज रात्री ते नवी दिल्लीत पोचणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री या नात्यानं त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. उद्या ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत.