July 4, 2024 10:13 AM July 4, 2024 10:13 AM

views 21

आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर

आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर असून 29 जिल्ह्यांमधील 16 लाखांहून अधिक लोक पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. काल आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 46 वर पोहोचली आहे, तर आणखी 3 जण बेपत्ता आहेत. राज्यभरातील 105 महसूल मंडळातील एकूण 2800 गावं पुरामुळे बाधित झाली असून 39 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. पुरामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील 178 वन तपासणी नाकी आणि प्राण्यांनी जवळच्या टेकड्यांवर स्थलांतर केलं आहे. प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी उद्...

July 2, 2024 8:13 PM July 2, 2024 8:13 PM

views 14

ब्राझीलच्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे किमान १७९ लोकांचा मृत्यू

ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे किमान १७९ लोक मरण पावले आणि ३३ लोक अद्याप बेपत्ता आहेत. राज्याच्या नागरी संरक्षण संस्थेनं ही माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांत, विपरित हवामानामुळे २ पूर्णांक ३९ दशलक्षाहून अधिक रहिवासी प्रभावित झाले आणि ४ लाख ५० हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरित करावं लागलं असल्याचं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे.