June 22, 2024 2:24 PM

views 16

तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा

तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. १२ डिसेंबर २०१८ ते १२ डिसेंबर २०२३ या दरम्यान पीक कर्ज घेतलेले शेतकरी या सवलतीसाठी पात्र असतील. कर्जमाफीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. यासाठी सरकारी तिजोरीतून ३१ हजार कोटी रुपये खर्च होणार असून राज्यातल्या ४० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं.