August 11, 2024 8:14 PM

views 20

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार – डॉ. एस. जयशंकर

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार असून, दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्यानं पारंपारिक स्वरुपाच्या पलीकडे मजल मारली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांच्या हस्ते आज मालदीव इथल्या अड्डू रेक्लमेशन अँड अड्डू शोअर प्रोटेक्शन या सागरी भराव आणि संरक्षण प्रकल्पांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. मालदीवमधल्या लोकांच्या जीवनाच्या सर्व पैलूंना अनुसरून त्याचे लाभ मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना आखणे हे दोन्ही देशामधल्या परस्पर सहकार...