June 18, 2025 2:18 PM

views 11

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसाचा जोर

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राजधानी मुंबईत काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. राज्य सरकारनं जारी केलेल्या पत्रकानुसार, गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे २९ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबई उपनगर जिल्ह्यात झाला आहे. त्याखालोखाल रायगडमध्ये जवळपास २२ मिलिमीटर, तर पालघरमध्ये २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.   कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला असला, तरी धरणातल्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगेची पा...