January 22, 2025 3:39 PM January 22, 2025 3:39 PM

views 17

नाशिक इथल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक इथल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देवस्थान पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेनं यासाठी नियोजन केलं आहे. या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं दिंड्या येत आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पौषवारी उद्यापासून ते २७ जानेवारी दरम्यान होणार आहे. यानिमित्तानं राज्यातले मान्यवर कीर्तनकार आपली कीर्तन सेवा देणार आहेत.

January 15, 2025 11:10 AM January 15, 2025 11:10 AM

views 17

नॉयलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने युवकाचा मृत्यू

नाशिकमध्ये संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव साजरा केला जात असतानाच नॉयलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने एका युवकाचा बळी गेला आहे. दरम्यान घातक मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून पोलीस आणि प्रशासनानं राज्यात अनेक ठिकाणी कारवाई करुन नायलॉन मांजाचे साठे जप्त केले आहेत.  

August 27, 2024 7:16 PM August 27, 2024 7:16 PM

views 22

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. ...

August 6, 2024 4:05 PM August 6, 2024 4:05 PM

views 12

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं आहे. गंगापूर धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या यावेळेपेक्षा दोन टक्के जास्त असला तरी जिल्ह्यातल्या २४ जलाशयात मिळून ६१ पूर्णांक ६२ शतांश टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या पालखेड धरणात ६६ टक्के आणि दारणा धरण समुहात ८६ टक्के इतका पाणीसाठा आहे. गिरणा धरणातही ७३ टक्के इतका पाणीसाठा आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जलसंपदा विभागानं पाण्याचा विसर्ग कमी केला असून सध्या गंगापूरमधून ४७० तर दारणा धरणातून ५ हजार ३५६ आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून...