August 14, 2024 3:56 PM

views 17

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका आहे – नाना पटोले

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका असून विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं ही काँग्रेसची प्राथमिकता असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसेल याचा निर्णय घेतला जाईल, असं पटोले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. युती सरकार हे महाभ्रष्ट सरकार असून त्यांनी राज्य विकायला का...

July 25, 2024 2:52 PM

views 31

ख्यातनाम साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन

साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज वसई इथं वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं होतं. आनंदाचे अंतरंग - मदर तेरेसा, ओॲसिसच्या शोधात, ख्रिस्ताची गोष्ट, तेजाची पाऊले, मुलांचे बायबल, सृजनाचा मळा ही फ्रान्सिस दिब्रिटो यांची पुस्तकं, तसंच ‘नाही मी एकला’ हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,...

July 22, 2024 7:53 PM

views 25

मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.  २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर केलं नाही, त्यामुळे तो विफल ठरला, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट केली असून सर्वपक्षीय बैठकीत यासंदर्भ...

July 8, 2024 5:55 PM

views 17

पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं – नाना पटोले

मुंबई आणि उपनगरात अनेक भागात पाणी तुडुंब भरलं असून पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अपयशाचं खापर पावसावर फोडू नये असंही ते म्हणाले. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाणं अत्यंत गंभीर आहे, सरकारनं काम केलं असत तर मुंबईची ही अवस्था झाली नसती, असं त्यांनी सांगितलं. चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सूत्रं असल्यानं मुंबईसह राज्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असं ते म्हणाले.

June 21, 2024 7:59 PM

views 27

नाना पटोले यांनी केली अटल सेतूची पाहणी

शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारनं १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढलं आहे, हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतूची पाहणी केली आणि रस्त्याला भेगा पडल्याचं निदर्शनास आणून दिले. नवी मुंबईच्या बाजूला हा रस्ता एक फूट खाली खचला आहे. 

June 21, 2024 6:21 PM

views 28

महायुती सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

महायुती सरकारविरोधात काँग्रेसनं आज राज्यभरात चिखल फेको आंदोलन केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपा आघाडीचं सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून मजा मारत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, महागाई, बेरोजगारीनं लोकांना जगणं कठिण झालं आहे. बियाणं आणि खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचं भविष्य सरकारनं उद्धवस्त केलं आहे. म्हणून हे आंदेलन केल्याचं पटोले यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगि...