August 15, 2025 1:47 PM
19
उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास
देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद जवानांनाही आदरांजली वाहिली. जगातली सर्वोत्तम उत्पादनं भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी दिली जात आहे, देशात येत असलेल्या परदेशी गुंतवण...