February 5, 2025 10:36 AM February 5, 2025 10:36 AM

views 12

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले... ‘‘शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन हे अधिवेशन धनंजय मु...

June 21, 2024 7:55 PM June 21, 2024 7:55 PM

views 18

केंदीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह १० राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद

केंद्र सरकारच्या धोरणानुसार डाळीच्या उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठातलं संशोधन, प्रगत शेती, सुधारित वाणांचा तसंच पाणी आणि खत वापराचं सुयोग्य नियोजन केलं जाईल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सांगितलं. देशात डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी काय काय करता येईल याविषयी केंदीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह १० राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. त्यात महाराष्ट्राची बाजू मांडतान...

June 18, 2024 5:39 PM June 18, 2024 5:39 PM

views 14

खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यास सुरुवात

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात आज झाली. शेतकऱ्यांना यावर्षी देखील पीक विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया द्यावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. विमा काढण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून  शेतकऱ्यांनी त्यापूर्वी  पीक विमा भरून घ्यावा, असं आवाहन कृषिमंत्र्यांनी केलं आहे. खरीप हंगामासाठी  भात, ज्वारी, सोयाबीन,कापसासह एकूण १४ पिकांचा विमा योजनेत समावेश  करण्यात आला आहे.