September 9, 2024 6:51 PM September 9, 2024 6:51 PM

views 16

हिंगोली आणि पालघर जिल्ह्यात एक गाव एक गणपती ही संकल्पना कायम

हिंगोली जिल्ह्यातल्या ३०५ गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही संकल्पना सुरू झाली. धुळे जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेल्या वर्षाचा तुलनेत यंदा घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातल्या उर्से गावातही एक गाव एक गणपती ही संकल्पना गेल्या ५१ वर्षांपासून सुरू आहे.

August 27, 2024 8:35 PM August 27, 2024 8:35 PM

views 10

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ३५ दिवसांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे. यासाठी आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ३५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान ब्लॉक नसेल. गोरेगाव-कांदिवली विभागातली गर्दी कमी करणं, उपनगरीय गाड्यांच्या वेळांमध्ये सुधारणा करणं आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी समर्पित लाइन्स तयार करण्यासाठी साडेचार किलोमीटरच्या सहाव्या मार्गाचं काम करण्यात येत असल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलं.  २८ ...

August 26, 2024 8:06 PM August 26, 2024 8:06 PM

views 11

मुंबई – गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई - गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी आज सार्वजनुक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही कंत्राटदारांमुळे महामार्गाचं काम रखडलं, त्यांच्यावर तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. खड्डे लवकर भरले जावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

August 14, 2024 8:17 PM August 14, 2024 8:17 PM

views 13

गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

येत्या गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत तसंच कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी असे विविध निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.   गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती य...