June 18, 2025 2:13 PM June 18, 2025 2:13 PM

views 19

क्रिकेट – हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश

इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात जलदगती गोलंदाज हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश झाला आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमधे पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी ट्वेंटी सामना खेळला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल करणार असून संघात ऋषभ पंत, यशस्वी जायसवाल, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नित...

February 6, 2025 11:43 AM February 6, 2025 11:43 AM

views 5

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज खेळला जाणार तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातला तीन 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल.या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी ओडिशामधल्या कटकमध्ये तर तिसरा आणि शेवटचा 50 षटकांचा सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.

February 3, 2025 11:28 AM February 3, 2025 11:28 AM

views 18

पुरुषांच्या 20 षटकांच्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना काल भारतीय संघाने दीडशे धावांनी जिंकला. वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 63 चेंडूत, 97 धावांवर बाद झाला.

January 22, 2025 10:39 AM January 22, 2025 10:39 AM

views 5

भारत-इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान वीस षटकांच्या मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यान टी-20 सामना मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील आजचा पहिला सामना कोलकाता इथं ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याची सुरुवात होईल. संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. 6 फेब्रूवारी पासून उभय संघादरम्यान तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.  

August 4, 2024 7:26 PM August 4, 2024 7:26 PM

views 9

दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य

कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं ९ गडी गमावून २४० धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं ३, तर कुलदीप यादवनं २ बळी घेतले.  शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं ५ षटकात बिनबाद २९ धावा केल्या होत्या.

July 23, 2024 10:48 AM July 23, 2024 10:48 AM

views 9

स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसलनं रचला नवा इतिहास

आयसीसी विश्वचषक लीग 2 मधील पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसल यानं पदार्पणातच 21 धावांमध्ये 7 गडी बाद करत आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचला आहे. काल डंडी इथं झालेल्या ओमान विरुद्धच्या सामन्यात त्यानं पाच षटकं आणि चार चेंडूत 7 बळी घेतले आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा विक्रम मोडला. रबाडानं 2016मध्ये बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 16 धावांत 6 बळी घेतले होते. रबाडाच्या व्यतिरिक्त व...

July 22, 2024 8:31 PM July 22, 2024 8:31 PM

views 13

भारतीय क्रिकेट संघ आज भारत-श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत दाखल

भारतीय क्रिकेट संघ आज भारत-श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत पोहोचला आहे. या दौऱ्यात पल्लेकेले इथं २७, २८ आणि ३० जुलै रोजी  टी ट्वेंटी मालिकेतले तीन सामने होणार आहेत.  तर कोलंबो इथं २, ४, आणि ७ ऑगस्ट रोजी  एकदिवसीय मालिकेतले तीन सामने खेळले जाणार आहेत. 

July 13, 2024 9:12 PM July 13, 2024 9:12 PM

views 18

टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा झिंबाब्वेवर निर्णायक विजय

झिंबाब्वेमधे हरारे इथं आज झालेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं झिंबाब्वेवर १० गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला, आणि झिंबाब्वेचा डाव १५२ धावांवर संपुष्टात आणला. झिंबाब्वेचा कर्णधार सिंकदर रझानं सर्वाधिक ४६ धावा केल्या. भारतातर्फे खलिल अहमदनं २, तर तुषार देशपांडे, वाशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, आणि शिवम दुबे, यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.  भारतानं विजयी लक्ष्य एकही गडी न गमावता १६ व्या षटकातच पार केलं. यशस्वी जयस्वालनं नाबाद ९३,...

July 11, 2024 8:52 AM July 11, 2024 8:52 AM

views 21

झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वीस षटकांच्या पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना काल भारतानं 23 धावांनी जिंकला. आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. कर्णधार शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 182 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल यजमान संघाचा डाव 159 धावांत संपुष्टात आला. डीऑन माईर्सनं सर्वाधिक 65 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 3 बळी घेतले. मालिकेतील चौथा सामना 13 जुलैला होणार आहे.  

June 20, 2024 8:30 AM June 20, 2024 8:30 AM

views 20

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा अफगाणिस्तानसोबत सामना

टी - ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. बार्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. या स्पर्धेत सध्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरु आहे. दरम्यान, काल झालेल्या सुपर एट मधल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेचा १८ धावांनी पराभव केला.