February 5, 2025 3:46 PM February 5, 2025 3:46 PM

views 14

महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा झाली आहे. इचलकरंजीतल्या शिवनाकवाडी गावात यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादातून सुमारे ३०० ते साडे तीनशे जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

February 3, 2025 3:16 PM February 3, 2025 3:16 PM

views 16

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी-काडगाव मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, ३० जण जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी-काडगाव मार्गावर काल रात्री एका खासगी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले. जखमींना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही बस गोव्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका खासगी कंपनीचे १४५ कर्मचारी ४ बसमधून गोव्याला सहलीसाठी गेले होते.त्यातली एक बस अपघातग्रस्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.      

October 4, 2024 9:36 AM October 4, 2024 9:36 AM

views 21

काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून उद्या ते संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत.

August 27, 2024 7:16 PM August 27, 2024 7:16 PM

views 21

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. ...

August 27, 2024 3:48 PM August 27, 2024 3:48 PM

views 11

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा विद्यापीठास समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा विद्यापीठाला समूह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या समूह विद्यापीठात वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, या महाविद्यालयासह यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, या महाविद्यालयांचा समावेश करून समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

July 23, 2024 8:43 AM July 23, 2024 8:43 AM

views 22

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे आणि १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी जाहीर करण्यात...

July 13, 2024 1:49 PM July 13, 2024 1:49 PM

views 23

महाराष्ट्रात नगरपंचायत आणि एका नगर परिषदेतल्या मिळून 11 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होणार

महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती, एका नगरपरिषदेतल्या सदस्य पदांच्या ११ रिक्त जागांसाठी, येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोल्हापूराच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणुकीही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी १२ ऑगस्ट ला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार २१ जुलै वगळून दिनांक १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २५ जुलै ला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या...

June 18, 2024 3:54 PM June 18, 2024 3:54 PM

views 25

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रास्तवित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मार्गासाठी संपादित करण्यात आलेली बहुतांश जमीन बागायती असून या महामार्गामुळे परिसरातल्या पर्यावरण आणि जैवविविधतेचा ऱ्हास होईल या कारणामुळे कोल्हापूरसह १२ जिल्ह्यातले शेतकरी याला विरोध करत आहेत.

June 14, 2024 3:23 PM June 14, 2024 3:23 PM

views 21

राजापूरमधील अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्याचं काम अद्याप सुरू

राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्री दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीच्या साह्याने ही दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आलं आहे. या मार्गावरून आता एका बाजूने दुचाकी वाहनांची वाहतूक सावधगिरीनं सुरू करण्यात आली असून, मोठ्या वाहनांनी आंबा घाटाच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं...