April 5, 2025 10:23 AM

views 25

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम हा नियामक व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम हा नियामक व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. दिल्लीत काल एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेपासून संरक्षण देण्यासाठी अंमलबजावणी करता येण्याजोग्या अधिकारांची आवश्यकता असण्यावर त्यांनी भर दिला. भारताने सायबर सार्वभौमत्व ठामपणे मांडले पाहिजे त्याचबरोबर ते जागतिक मानकांशी जुळणारे असावे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

June 22, 2024 8:00 PM

views 33

विविध क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामंजस्य करार

भारत – बांग्ला देश दरम्यान आज विविध क्षेत्रातले महत्त्वाचे सामंजस्य करार झाले. यात पर्यावरणस्नेही उपक्रम, सागरी व्यापार, रेल्वे दळणवळण, आरोग्य आणि वैद्यक, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांग्ला देशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्याबरोबर आज नवी दिल्लीत हैद्राबाद हाऊस इथं दि्वपक्षीय चर्चा केली. त्यानंतर ह्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. बांग्ला देशी नागरिकांना भारतात वैद्यकीय उपचारांसाठी ई- व्हिसा दिला जाईल, तसंच बांग्ला देशात रंगपूर इथं नवीन सह...