February 11, 2025 9:17 AM

views 34

सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची मागणी

जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत त्या काल शून्य प्रहरात बोलत होत्या. सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली.