September 26, 2024 7:27 PM

views 42

राज्यातल्या अनेक धरणांच्या पातपातळीत वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यावर पोहोचला असून धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. लातूर जिल्ह्यातल्या तेरणा, मांजरा आणि रेणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यापैकी रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये विष्णुपुरी प...