भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आणि अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वूमीवर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज २ हजार ९७५ अंकाची वाढ नोंदवत ८२ हजार ४३० अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९१७ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ९२५ अंकांवर बंद झाला.
ही चालू वर्षातली आतापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे. परकीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आणि जागतिक पातळीवरचे सकारात्मक संकेत यांमुळे ही वाढ दिसून आल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.