डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

विधानसभेची यंदाची राज्यावर प्रेम करणारे आणि राज्याची लूट करणारे यांच्यातली लढाई आहे. महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं.

 

औरंगाबादचं नामांतर केल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा आहे. मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला होता, असं ते म्हणाले. चिखलठाणा विमानतळाला अजून संभाजी महाराजांचं नाव का दिलं नाही, असा सवाल त्यांनी केला.