डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 4, 2025 7:13 PM

printer

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

नैसर्गिक आपत्तीकाळात सामान्य नागरिकांना झळ बसू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन व्यवस्थापन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

 

नद्यांच्या पूर रेषेच्या आत अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, यासाठीचं सर्वेक्षण करताना अचूकतेसाठी उपग्रहाद्वारे मॅपिंग करावं. भूमिगत वीज वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळामधले आसरे बांधणे, दरडप्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणि वीज अटकाव ही कामं वेगाने करावी, असं त्यांनी सांगितलं.

 

आपदा मित्रांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांचा डाटाबेस तयार करावा.  आपत्तीसंदर्भात सर्वंकष अभ्यास करून ग्रामपंचायतींना आपत्ती व्यवस्थापनाचे संच उपलब्ध करून द्यावे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

नद्यांची वहन क्षमता वाढवण्यासाठी नदी स्वच्छ करून नदीतील गाळ काढणे, राडा रोडा काढणे आवश्यक आहे. या कामाला जलसंपदा विभागानं प्राधान्य द्यावं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा