उदयोग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचा प्रमुख उपक्रम असलेल्या पाचव्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत.
केंद्रसरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला अनुसरून, स्टार्टअप इंडिया हा कार्यक्रम, स्टार्टअप्सना मान्यता देऊन, कर सवलत, नियमन सुलभता, निधीची उपलब्धता आणि क्षमता विकास, यासारख्या उपक्रमांमधून समर्थन देतो, असं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांमध्ये कृषी, स्वच्छ ऊर्जा, फिनटेक, एरोस्पेस, आरोग्य, शिक्षण, सायबर सुरक्षा आणि उपलब्धता, यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.