श्रीलंकेच्या नौदलाकडून ३४ भारतीय मच्छिमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलानं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३४ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. बेकायदेशीर मासेमारीसाठीच्या तीन ट्रॉलिंग बोटीही जप्त केल्या आहेत. या बोटींनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचे उल्लंघन केल्याबद्दल त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यापूर्वीही, ४१ भारतीय मच्छिमारांना देशात परत पाठवण्यात आलं असल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयानं दिली आहे. मच्छिमार संघटनांनी या अटकेचा निषेध केला आणि केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात दंड न लावता मच्छिमारांना सोडण्यासाठी कारवाई करण्याची विनंती केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.