भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि श्रीलंके दरम्यान तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळत आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या  १३ षटकांत २ बाद १४६ धावा झाल्या होत्या. सुर्यकुमार यादवं या सामन्यात अर्धशतक केलं.