सर्वोच्च न्यायालयातर्फे २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन

सर्वोच्च न्यायालय २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन करणार आहे. त्यात प्रलंबित खटले मार्गी लावणं, सामंजस्यानं तोडगा काढणं याला प्राधान्य दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचं आयोजन होतंय. सर्वोच्च न्यायालयात खटले प्रलंबित असणाऱ्या याचिकाकर्त्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं आहे.