डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत-स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर -स्पेन प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ

भारत – स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील असं स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी म्हटलं आहे. मुंबईत चौथ्या स्पेन- भारत मंचाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शाश्वत भविष्याच्या दृष्टीनं या दोन्ही देशांचं सहकार्य सकारात्मक पुढाकार ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या वाढत्या भूराजकीय तणावाच्या काळात मानवी हक्कांचं आणि नागरिकांचं संरक्षण या बाबींवर लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले. व्यापार, गुंतवणूक त्याचप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञान आणि त्यानं निर्माण झालेली आव्हानं या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या मंचाची संकल्पना सध्याच्या भूराजकीय आणि तंत्रज्ञान विषयक आव्हानांसंदर्भात स्पेन – भारत भागीदारी : नवी क्षितिजं, नवीन शक्यता अशी आहे.