नैऋत्य मान्सून यंदा लवकर सुरु होण्याची शक्यता असून, येत्या २ ते ३ दिवसांमध्ये तो केरळमध्ये प्रवेश करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये पुढले २ ते ३ दिवस जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे.
आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरासह ईशान्य भारतात येत्या रविवारपर्यंत, तर पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आणि उत्तराखंडमध्ये उद्यापर्यंत जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, श्रीलंकेत मान्सून सर्वदूर पोहोचल्याचं वृत्त आहे.